Monday 15 November 2010

मी.

आज खरंच असं वाटलं की मी काय करतोय???
मला हेच करायचं होतं का?? किंवा करायचं आहे का?

म्हणायला गेलं तर खुपच साधा प्रश्न, आणि म्हणायला गेलं तर खुपच अवघड सुद्धा.
गंमत म्हणजे, काल परवा पर्यंत असं वाटत देखील नव्हतं नेमकं काय चाललय माझ्या आयुष्यात, मस्तपैकी नौकरी आहे, पोटापुरतं मिळतंय, म्हंजे एकुण सुखात चाललय. पण मग अधुन मधुन हे असं अस्वस्थं का वाटायला लागलंय मला?. कधी कधी ते संदीप - सलील चं गाणं "आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो, चाकोरिने खरडुन कागद सहीस पाठवीतो.... " मला माझ्याबद्दलच लिहीले आहे असंच वाटायला लागतं. पण खरचं सांगायच तर सध्याच्या आयुष्याबद्दल तक्रार करण्यासारखं काहीच नाहीये पण तरीहि हे असं का वाटतय त्याचा काही पत्ता लागत नाहीये.????